कार्य

१) बाजार आवारात शेतीमाल खरेदी-विक्री व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवणे,
२) शेतकर्‍यांच्या शेतीमालाविषयी हित संरक्षण करणे,
३) बाजार आवारात विक्रीस आलेल्या शेतीमालाचे चोख वजनमाप करणे,
४) शेतकर्‍यांना शेतीमाल विक्रीचे २४ तासात पैसे मिळवून देणे,
५) विवादाची विनामुल्य तड़जोड़ करणे,
६) शासनाने निश्चित केलेल्या शेतीमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात शेती मालाची खरेदी-विक्री व्यवहार होणार नाहीत याची दक्षता घेणे,
७) शेतीमालाची प्रत व दर्जा वाढविण्यासाठी शेतकर्‍यांना उत्तेजित करणे,
८) आड़ते / व्यापारी, हमाल, तोलणार, मदतनीस, प्रक्रियाकार यांना अनुज्ञप्ति देणे, अनुज्ञप्ति नुतनीकरण करणे, रद्द करणे इ. व
९) बाजार समिती कायदा व नियमातील तरतुदीनुसार अनुज्ञप्तिधारी यांच्या हिशोबाच्या नोंदवह्या व अनुषंगिक कागदपत्रांची तपासणी करणे व हिशोब / बिलपट्ट्या प्रमाणित करणे.

प्रशासकीय कार्यालयाचा पत्ता

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती कल्याण,
मा. शरदचंद्रजी पवार मुख्य बाजार आवार, "एन" टाईप इमारत,
1 ला मजला, कल्याण-शील रोड,
कल्याण (प) - 421 301
जि. ठाणे, महाराष्ट्र, भारत

दूरध्वनी क्रमांक : ०२५१ २९७ ०३१६

ओळख

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना तत्कालीन मुंबई सरकारने मुंबई कृषि उत्पन्न खरेदी विक्री (नियम) अधिनियम १९३९ च्या कलम ४(१) प्रमाणे दि. ०१.०५.१९५७ रोजी केली व भात, तांदुळाचे नियम व बाजार क्षेत्र घोषित केले. सद्यस्थिस्तीत कल्याण व डोंबिवली अशी दोन मोठी शहरे यांचा समावेश आहे.